हिंदी पाठोपाठ आता मराठी वेब सिरीजची सुद्धा ओ.टी.टी. वरती चांगलीच धूम आहे.मराठीत सुद्धा नवीन दिग्दर्शक तसेच नवीन निर्माते नवीत विषय मांडून मराठी चित्रपटसृष्टीला नवे वळण देण्याचा प्रयत्न करताहेत जे विषय रोजच्या कमर्शियल चित्रपटांपेक्षा वेगळे आहेत आणि प्रेक्षक सुद्धा या सिरीजची तारीफ करताहेत.अशीच एक वेब सिरीज ४ ऑक्टोंबर २०२४ रोजी सोनी लिव या ओ.टी.टी चॅनेल वरती प्रदर्शित झाली जी वेब सिरज एका विशिष्ट कालखंडातील असून सत्य घटनेवर आधारित हि वेब सिरीज आहे जिचे नाव मानवत मर्डर्स आहे.आशिष बेंडे दिग्दर्शित हि वेब सिरीज सोनी लिव वरती प्रदर्शित झाली असून आठ एपिसोड ची हि वेब सिरीज आहे.
मानवत मर्डर्स महाराष्ट्रा सह देशाला हादरवणार मानवत हत्याकांड वर आधारित हि आठ एपिसोड ची वेब सिरीज आहे.मानवत हे परभणी जिल्ह्यातील गाव जिथे गुप्तधनासाठी जादूटोण्यासाठी कितीतरी बळी घेण्यात आले.मानवत मध्ये गुप्तधनासाठी ११ जणींची निर्घुण हत्या झाली होती तरीही हि लोक फाशी पासून वंचित होती.परभणी जिल्ह्यातील १९७२ ते १९७४ दरम्यान या गोष्टी व्हायच्या ज्या फक्त मांत्रिकाच्या सल्ल्यावरती एका मागोमाग मुली बायका गायब व्हायच्या त्यांचे छीन्न शरीरी शेतात जंगलात फेकले जायचे परंतु कोण करायचे याचा पत्ता अजिबात लागत नव्हता.हा सगळा प्रकार सुरु होता १९७२ ते १९७४ या कालखंडात.महाराष्ट्रला हादरवनार अस घृणास्पद सिरीयल किलिंग या ठिकाणी सुरु होत. मानवत मर्डर्स म्हणजे मानवत हत्याकांड हे जेव्हा झाल तेव्हा तत्कालीन गृहमंत्री माननीय शरद पवार होते. त्यांनी डी.सी.प. रमाकांत कुलकर्णी यांना हि केस सोपवली होती.मानवत केस सुटत नव्हती काही लीड सुद्धा मिळत नव्हत्या आणि नं ऐकाव्या अशा गोष्टी मानवत मध्ये घडत होत्या.रामकांत कुलकणी यांच्या फूटप्रिंट्स ओन द सँडस ऑफ क्राईम २००४ या पुस्तकावर आधारित आहे.
मानवत मर्डर्स मध्ये आशुतोष गोवारीकर रमाकांत कुलकर्णी यांच्या भूमिकेत असून.सोनाली कुलकर्णी,सई ताम्हणकर,किशोर कदम,मयूर खांडगे,असून फैजल महाडिक ने या वेब सिरिज चे संकलन केले आहे. आठ एपिसोड ची हि वेब सिरीज आहे.आशिष बेंडे दिग्दर्शित हि वेब सिरीज आहे.आशिष बेंडे यांनी या पूर्वी आत्मपँम्फ्लेट हा सिनेमा दिग्दर्शित केला असून अमाझोन प्राईम वरती तो प्रदर्शित झालेला आहे. आत्मपँम्फ्लेट आशिष बेंडे यांचा पहिला सिनेमा असून हा खरच प्रेक्षकांनी बघावा असा सिनेमा आहे.जो परेश मोकाशी निर्मित असून मधुगंधा कुलकर्णी लिखित आहे.याआधी आशिष बेंडे यांनी परेश मोकाशी यांना सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम काम केले आहे.त्यान हरिश्चंद्रा ची फॅक्टरी,एलिझाबेथ एकादशी,शाळा ,चिंटू ,बाजी या सिनेमांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
मानवत हे १५००० वस्तीचे परभणी जिल्ह्यातील एक छोटे गाव.तिथे १९७२ ते १९७४ या काळात सात स्त्रियांचे खून होतात.हे नरबळी की जादूटोणा ? गावामध्ये काही मांत्रिक असतात अपत्यप्राप्ती होत नसेल किंवा संपत्तीचा साठा कुठे आहे याचा सुगावा लावायचा असेल तर मांत्रिकाची मदत घेण्याची प्रथा त्या भागात असते.अशा परिस्थितीत एका मागोमाग एक असे खून होण्यास सुरुवात होते,तीन लहान मुली गायब होतात.चार विवाहित स्त्रियांची कुऱ्हाडीने हत्या होते.काही मृतदेह त्याच ठिकाणी सापडताततर काही खुनाच्या ठिकाणापासून दुसरीकडे आढळतात.याचा माग काढणे स्थानिक पोलिसांच्या आवाक्याबाहेर आहे.असे वाटल्यामुळे स्पेशल क्राईम ब्रांचचे डेप्युटी कमिशनर रमाकांत कुलकर्णी यांना परभणीला पाठवण्यात येते.१९६८ मध्ये रामन राघव या खुन्याला पकडण्यात कुलकर्णीना यश मिळाले असल्याने या सलग होणाऱ्या खुनांचा तातडीने तपास करण्यासाठी त्यांची निवड होते.अशा खुनांचा तपास करण्यात त्यांचा हातखंडा असल्याचे मानले जायचे या लौकिका प्रमाणेते इथे घडणाऱ्या खुणांच्याही तळाशी पोहचतात… साधारण पन्नास वर्षापूर्वी मानवत मध्ये घडलेल्या त्या खुनांच्या घटना आणि तपासाच्या आठवणीना उजाळा मिळाला आहे तो मानवत हत्याकांड या वेब सिरीज मुळे…
मानवत मध्ये घडलेल्या सत्यघटनेवर आधारीत मानवत मर्डर्स हि वेब सिरीज नुकतीच सोनी लिव्हवर प्रदर्शित झाली आहे.आठ भागांची हि मराठी मालिका रमाकांत कुलकर्णी लिखित फूटप्रिंट्स ओन द सँडस ऑफ क्राईम २००४ या पुस्तकावर आधारित आहे.गिरीश जोशी यांनी लिहिलेली आखीव पटकथा या वेब मालिकेमध्ये प्रेक्षकांना बांधून ठेवते.कुऱ्हाडीने केलेले काही घाव दाखवले असलेतरी खून रक्ताच्या चिळकांड्या दाखवण्यावर या मालिकेचा भर नाही.अशा सत्यघटनेवर आधारित वेब सिरीज दोन पद्धतीने लिहिता किंवा दिग्दर्शित करता येते.गावकऱ्यांमध्ये असलेली अंधश्रद्धा-त्यातून होणारे खून –खुनांचा तपास हि पटकथा लिहिण्याची एक पद्धत,परंतु वेब सिरीज ची पटकथा लिहिताना भर पोलीस तपासावर दिला आहे.खुनांच्या तपासासाठी रमाकांत कुलकर्णी यांची नेमणूक होणे,एकेका खुनाची त्यांनी घेतलेली माहिती आणि त्या अनुषंगाने तपासाच्या वेळी घडणारे नाट्य,अशा प्रकारे सिरीजच्या एकेका भागातून प्रेक्षकांना या घटनाक्रमाचा उलगडा होत जातो.
आशिष बेंडे यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिरीजच्या पहिल्या तीन भागांमधील तपासाला एक दिशा सापडते.आणि शेवटच्या दोन भागांमध्ये सस्पेन्स चा उलगडा होतो.फैजल महाडिक यांचे संकलन दाद देण्यासारखे आहे.पटकथा उत्तम असली तरी भाषा परभणीची स्थानिक वाटत नाही.या मराठी सिरीजच्या निमित्ताने त्या मातीतल्या भाषेचा सुगंध महाराष्ट्रात पोहोचला असता.रामकांत कुलकर्णीचा सहाय्यक नेहमी त्यांना एकच प्रश्न विचारतो,आता तपासाची पुढची दिशा काय ? मुख्य तपास अधिकारी हुशार दाखवताना बाकीचे इतके बधीर असलेले का दाखवावेत हा प्रश्न पडतो.
अभिनयाची बाजू सोनाली कुलकर्णी,मकरंद अनासपुरे यांनी उत्तम संभाळली आहे.पण खरी कमाल केली आहे साई ताम्हणकरने.सई ने पकडलेले भूमिकेचे बेअरिंग कमालीचे आहे. समिंद्री बाईचे बावरलेपण, देशी दारूच्या भट्टीवर तीचे गूढ वागणे,मुलीला शोधताना होणारी तिची घालमेल,उत्त्मारावाच्या घरात होणारी तिची घुसमट असे भूमिकेचे अनेक पैलू सई ने कमालीच्या कौशल्यानेसाकारले आहेत मकरंद अनासपुरेंनी खाल्प्रवृत्तीचे बेअरिंग उत्तम सांभाळले आहेत.पण काही प्रसंगात ते सोडून अनासपुरी स्टाईलने त्यांचे हसणे खटकणारे आहेत.रमाकांत कुलकर्णी या पत्रासाठी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची निवड करण्यामागचे नियोजन समजले नाही.पूर्ण सिरीज मध्ये ते एकाच चेहऱ्याने वावरताना आणि एकाच टोन मध्ये बोलताना दिसतात.अलीकडे याला संयत अभिनयाची शैली म्हणत असावेत.वेशभूषेवर उत्तम खर्च केला असल्यामुळेसगळ्यांचे कपडे नवे दिसतात मात्र गोवारीकरांचा विग खटकतो.
सस्पेन्स समजण्यासाठी वेबसिरीजच्याप्रेक्षकांना सातव्या भागापर्यंत खिळवून ठेवण्यात मानवत मर्डर्स कमी पडते.पण हि मालिका आवर्जून बघावी अशी आहे. मानवत मर्डर्स बघितल्या नंतर आपल्याला कळते की असे प्रकार असे प्रकार आपल्या भारता सारख्या ठिकाणी व्हयाचे आणि ते सुद्धा महाराष्ट्रा सारख्या ठिकाणी परंतु हे प्रकार अजून सुद्धा थांबलेले नाहीत नरबळी जादूटोणा अजून सुद्धा भारतासारख्या ठिकाणी काही अंधश्रद्धेपोटी आपल्या शहरात होत आहे. या अंधश्रद्धेपोटी निरागस लोकांचा जीव जात आहेत.काही लोक हा प्रकार थांबवण्याचा खूप प्रयत्न करताहेत लोकांना यश सुद्धा मिळते.परंतु ज्यांची क्रूर बुद्धि आहे व ज्यांना घृणास्पद कार्य करायचे आहेअसे सिरीयल किलिंग भारतात अजून सुद्धा महाराष्ट्रा सह इतर राज्यांमध्ये होत आहे. मानवत मर्डर्स या हत्याकांडाची दखल शरद पवारांनी घेतेली होती व त्यासाठी त्यांनी वरिष्ठ अधिकारी रमाकांत कुलकर्णी यांची नेमणूक केली होती.सोबतच पोलीस अधीक्षक एन एम वाघमारेतासेक तसेच क्राईम ब्रांच मधील अन्य अधिकारी यांना हि केस सोपवली होती व त्यांनी योग्य रित्या या केस चा छडा लावला. मानवत मर्डर्स चे गूढ काय,खरे आरोपी कोण ? हे प्रकरण कसं घडलं याचे सर्व इतिवृत्त मानवत मर्डर्स मध्ये आपल्याला पायाला मिळते.
लंपन मानवत मर्डर्स सारख्या उत्तम दर्जाच्या सिरीज मराठी मध्ये बऱ्याच काळानंतर येत आहेत.हि त्यातल्या त्यात समाधानाची बाब. मानवत मर्डर्स हि मराठी वेब सिरीज असून ज्याचे आय.एम.डी.बी. रेटिंग १० पैकी ७ असे आहे.सध्या ओ.टी.टी.वरती समांतर,काले धंधे,लंपन अशा वेब सिरीज असून ज्या बघण्यासारख्या आहेत. विशेष म्हणजे मराठीत नवीन दिग्दर्शक क्राईम थ्रिलर वेब सिरीज सुद्धा घेऊन येत असल्यामुळे मराठीत नवीन काही तरी बघयला मिळत असल्याचे प्रेक्षकांना समाधान आहे.