Site iconSite icon cinemamandi.com

अशी हि बनवा बनवी एक उत्कृष्ट चित्रपट

अशी हि बनवा बनवी एक उत्कृष्ट चित्रपट. सचिन पिळगांवकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सचिन यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या हृदयावर अजूनही राज्य केले आहे.सचिन पिळगांवकर यांचे मराठी चित्रपट सृष्टीत मोलाचे योगदान असून ते हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे. सचिन पिळगांवकर यांचा जन्म १७ ऑगस्ट १९५७ रोजी मुंबईत झाला असून बाल कलाकार म्हणून त्यांनी चित्रपट सृष्टीत काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी अशी हि बनवाबनवी,आमच्या सारखे आम्हीच,आयत्या घरात घरोबा, गम्मत जम्मत,नवरा माझा नवसाचा हे चित्रपट दिग्दर्शित केले असून जे मराठी चित्रपट सृष्टीतील अफलातून चित्रपट आहेत जे अजूनही प्रेक्षकांच्या हृदयावरती राज्य करत आहे. अशी हि बनवा बनवी एक उत्कृष्ट चित्रपट.

अशी हि बनवा बनवी एक उत्कृष्ट चित्रपट / Photo credit – You tube snapshot

अशी हि बनवा बनवी एक उत्कृष्ट चित्रपट.

२३ सप्टेंबर १९८८ रोजी प्रदर्शित झालेली हे फिल्म सचिन पिळगांवकर यांच्या  सर्वोत्कृष्ट चित्रपटा पैकी असून एक अफलातून कॉमेडी यात आहे.किरण शांताराम निर्मितवसंत सबनीस लिखित या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन यांनी केले आहे. अशोक सराफ, लक्ष्मी कांत बेर्डे, सचिन, सिद्धार्थ रे, अश्विनी भावे, सुप्रिया पिळगांवकर, प्रिया बेर्डे, निवेदिता सराफ यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट जो अजूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो आहे, “धनंजय माने इथेच राहतात काय” हा लक्ष्मीकांत चा संवाद अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

चार मित्रांची कथा

अशी हि बनवा बनवी  हि चार मित्रांची कथा असून जी आपापल्यागावातून शहरात येतात.राहण्यासाठी छत बघतात व त्या छता साठी चालणारी धडपड म्हणजेच अशी हि बनवा बनवी  जे शेवट पर्यंत आपल्या घर मालकाला बनवत राहतात व एके दिवसी त्यांच खर रूप मालका समोर येत.हा चित्रपट म्हणजे एक जबरदस्त कॉमेडी चित्रपट असून एक सदाबहार चित्रपट आहे. २३ सप्टेंबर १९८८  रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करून आहे. हीच या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची सचिन पिळगांवकर यांची ताकत आहे.

धनंजय माने इथेच राहतात काय? 

धनंजय माने (अशोक सराफ) हा एका सौंदर्य प्रसाधनाच्या दुकानात विक्रेता असून  जो एक खूप हुशार विक्रेता आहे. ज्या दुकानात तो काम करतो त्याच दुकानातील मालकीण  माधुरी (अश्विनी भावे)  वरती तो गुप्त पणे एक तर्फी प्रेम करतो. धनंजय  हा पुण्यातील विश्वासराव सरपोतदार (सुधीर जोशी) यांच्या घरी लहान भाऊ शंतनू (सिद्धार्थ रे) यांच्या सोबत भाड्याने राहतो..शंतनू हा वैद्यकीय विद्यार्थी असतो. विश्वासराव सरपोतदार (सुधीर जोशी ) हा एक कंजूष घरमालक असून दोघांनाच राहण्याची परवानगी तो देतो अशातच एक दिवस गावावरून धनंजय माने यांचे दोन  मित्र सुधीर (सचिन), परशुराम (लक्ष्मीकांत बेर्डे), हे आपापल्या गावावरून भांडण करून पुण्यात धनंजय यांच्या कडे येतात. आता पुण्यात धनजंय यांचीच रहायची बोम्ब त्यात हे दोघ तरी पण सरपोतदार यांची मनाई असताना धनंजय सुधीर आणि परशुराम यांना गुप्त पणे आपल्या सोबत ठेवतो.

परंतु एके दिवसी मध्य रात्री चौघे जण दारूच्या नशेत विश्वासराव सरपोतदार यांच्या घरात घुसून दांगोडो घालतात. व  दुसऱ्या दिवशी सरपोतदार त्यांना घरातून बाहेर काढतात.भाड्याने घर शोधण्याच्या अथक प्रयत्ना नंतर धनंजय यांना एका ठिकाणी श्रीमंत,वृद्ध, दयाळू आणि मोतीबिंदू असले ली विधवा बाई लीलाबाई काळभोर यांच्या कडे भाड्याने  खोली मिळते. परंतु त्यांची एक अट असते ती फक्त विवाहित लोकांनाच घर भाड्याने देऊ इच्छिते अशातच धनंजय याला एक युक्ती सुचते व तो विवाहित असल्याचे कळवते मग काय इथूनच चित्रपटाची अफलातून कथानक सुरु होते.

अशी हि बनवा बनवी  एक अफलातून कथा

धनंजय आणि शंतनू ,सुधीर आणि परशुराम ला महिलांचे कपडे घालण्यास भाग पाडण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसल्याचे कळवतो व इथूनच चित्रपटाची बनवाबनवी सुरु होते जी अफलातून आहे. परशुराम त्याच्या मिशा काढतो आणि स्वतःला धनंजयची माने ची  पत्नी पार्वती मध्ये रुपांतर करतो, तर सुधीर स्वतःला  शंतनू ची पत्नी सुधा मध्ये रुपांतर करतो. लीलाबाईंच्या बंगल्यात विवाहित जोडपे भाड्याने राहायला आल्यानंतर लीलाबाईंची भाची मनीषा (सुप्रिया पिळगांवकर) आणि तिची बालपणीची मैत्रीण सुषमा (निवेदिता जोशी) ज्या दोघी योगायोगाने लीलाबाईंच्या घरी काही महिन्यासाठी राहायला येतात. सुषमा हि शंतनू ची मैत्रीण असते.जे दोघेही एकच कॉलेज मध्ये असतात.व एकतर्फी प्रेमात सुद्धा. सुधीर हा एक यशस्वी गायक आणि संगीत शिक्षक असून तो लवकरच मनीषा (सुप्रिया पिळगांवकर) च्या प्रेमात पडतो आणि मनीषा ला सुद्धा सुधीर च्या प्रेमात पाडतो, तो सांगतो की तो सुधाचा जुळा भाऊ असून शंतनूसोबतचे लग्न त्याला मान्य नव्हते आणि त्यामुळे तो दोघांशीही बोलत नाही. अशी हि बनवा बनवी एक उत्कृष्ट चित्रपट

अशी हि बनवा बनवी एक उत्कृष्ट चित्रपट /Photo credit -You tube snapshot

दुसरी कडे शंतनू हा मेडिकल चा विद्यार्थी असून सुषमा त्याच्यावरती चांगलीच रागवलेली आहे. कारण हे दोघेही एकमेकांना कॉलेज मध्ये असताना पासून प्रेम करतात त्यात ती शंतनू वरती सुधासोबतच्या लग्नामुळे ती खूप नाराज आहे. तिला वाटते की शंतनू ने तिच्या बरोबर विश्वासघात केला. त्यावरून शंतनू तिचा राग कमी करण्याचा प्रयत्न करतो  तो सुषमा ला बनवण्याचा प्रयत्न करतो की सुधाला पोटाचा कर्करोग आल्याचे खोटी कहाणी सांगतो.त्यामुळे त्याने सुधा बरोबर लग्न केले. अशी हि बनवा बनवी एक उत्कृष्ट चित्रपट

दुसरीकडे, छबुरावच्या नाट्यमंडळासह पुण्यात आल्यावर परशुराम कमलीशी (प्रिया बेर्डे) पुन्हा भेटतो आणि कोल्हापुरात परशुराम  एक यशस्वी नाटककार बनल्याची बातमी देखील सांगतो. त्याचदरम्यान लीलाबाईच्या बंगल्यावर धनंजय माने चे पार्वतीशी लग्न झालेले पाहून माधुरीचे(अश्विनी भावे) मन दुखावले जाते, परंतु धनंजय एका पत्राद्वारे माधुरीला सत्य परिस्थिती सांगतो.आणि धनंजय आणि माधुरी दोघेई एकमेकांवर प्रेम करतात. चारही मित्र लीलाबाई सोबत आईच्या प्रेमाचे नाते निर्माण करत असताना, परंतु या नात्याला सुद्धा कुणा नं कुणाची नजर लागतेच.बाली (विजू खोटे) लीलाबाई चा पुतण्या जो लीलाबाई ची मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न करतो.तो नेहमी लीलाबाई ला धमकावण्याचा प्रयत्न तसेच मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न करतो. लीलाबाईच्या मोतीबिंदूचा तर त्याने चांगलाच फायदा घेतलेला असतो.हे चारही जण विवाहित जोडप्या सारखे राहत असून बाली या चौघांना धडा शिकवण्याचा प्रयत्न करतो.व एक दिवस या सर्वांची खरी ओळख लीलाबाई समोर उघड करतो.

आपण चौघांनी लीलाबाई यांना बनवल्या मुळे हे सर्व जण  माधुरीच्या (अश्विनी भावे) च्या  मदतीने हे चारही जण नवीन निवासस्थानी जायचे ठरवते.लीलाबाईचा बंगला सोडण्याचा निर्णय घेतात कारण या चौघांना लीलाबाईना बनवल्याचा स्वतः ला खूप लाज वाटते.तेवढ्यात बाली (विजू खोटे) काही  गुंडा सह लीलाबाई तसेच या चारही जणांवर वर प्राण घातक हल्ला करतो. परंतु हा हल्ला हे चारही जण चांगला रोखून धरतात व बालीला पराभूत करतात बाली हा फक्त लीलाबाई यांच्या मालमत्ते वर डोळे टाकून असतो.व लीलाबाई बाली ला पोलिसांच्या स्वाधीन करते. बाली ला आपला पुतण्या असल्याचे सुद्धा नाकारते. धनंजय, शंतनू, सुधीर, परशुराम जरी लीलाबाई सोबत खोटे बोलले असले तरी त्यांना ती आपला मानते व चारही जनाचे आपापल्या जोडीदारा बरोबर लग्न लावून या नाविविवाहित जोडप्यांचा फोटो काढते.व आपल्या घरात सुद्धा जागा देते.या चारही जन लीलाबाई यांना बनवले असले तरीही त्यांनी लीलाबाई यांचे कुठलेही आर्थिक किंवा मानसिक नुकसान केलेले नसते.त्यामुळे लीलाबाई या सर्वाना आपल्या घरात पुन्हा जागा देते.

अशी हि बनवा बनवी एक उत्कृष्ट चित्रपट असून सचिन पिळगांवकर यांच्या महत्वाच्या चित्रपटापैकी एक आहे. किरण शांताराम यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून. वसंत सबनीस यांनी हा चित्रपट लिहिला आहे. सुधीर जोशी यांचे या चित्रपटातील व्यक्तिरेखा कमी असली तरीही ते लक्षात राहण्याजोग आहे.हृदयी वसंत फुलताना हे या चित्रपटातील अनुराधा पौडवाल,सुदेश भोसले,सुरेश वाडकर,यांनी गायले आहे. अशी हि बनवा बनवी एक उत्कृष्ट चित्रपट असून प्रेक्षकांसाठी हा  अमेझोन प्राईम तसेच युट्यूब वरती सुद्धा उपलब्ध आहे.

Exit mobile version