Ata Thambaycha Naay : बी.एम.सी.कर्मचाऱ्यांची रात्र शाळा हा मराठी चित्रपट १ में २०२५ रोजी महाराष्ट्र भर प्रदर्शित झाला.प्रत्येकाने कुटुंबा सोबत बघावा असा हा चित्रपट असून कामगार दिना निमित्त हा प्रदर्शित करण्यात आला.मुंबईतील साफ सफाई कामगार यांच्या दैनंदिन आयुष्य जगत असताना ते रात्र शाळेत जाऊन दहावी वर्ग पास होतात. दिग्दर्शक शिवराज वायचळ यांनी मराठी चित्रपटात हा नवीन विषय यशस्वी रित्या मांडला आहे.आता थांबायचं नाय ! या चित्रपटातील कथा मुंबई महानगर पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या जीवनावर आधारित असून हि एक सत्य कथा आहे.२०१७ साली मुंबई महानगर पालिकेतील २३ कामगारांनी दहावी ची परीक्षा उत्तीर्ण केली होती. झी स्टुडीओ प्रस्तुत Ata Thambaycha Naay : बी.एम.सी.कर्मचाऱ्यांची रात्र शाळा.
Ata Thambaycha Naay : बी.एम.सी.कर्मचाऱ्यांची रात्र शाळा
दिग्दर्शक शिवराज वायचळ यांनी आपल्या दिग्दर्शनातील पदार्पणात खूप सुदंर विषय यशस्वी रित्या मांडला आहे. मुंबई महानगर पालिकेतील सफाई कामगार कोणी विचार सुद्धा केला नसेल की संपूर्ण मुंबईतील कचरा जे साफ करतात त्याचं आयुष्य हे किती धोकादायक परिस्थिती मध्ये ठेवून ते हे काम करतात याचा अनुभव चित्रपट बघितल्यावर आपल्याला कळते. दिग्दर्शक शिवराज वायचळ यांनी पदार्पणातच खूप सुंदर विषय हाताळला असून त्यांनी या चित्रपटाचे लिखाण देखील केले आहे.सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, ओम भूतकर,पर्णा पेठे, किरण खोजे, प्राजक्ता हनमघर,दीपक शिर्के अभिनित हा चित्रपट असून आशुतोष गोवारीकर एका महत्वाच्या भूमिकेत आहे. Ata Thambaycha Naay : बी.एम.सी.कर्मचाऱ्यांची रात्र शाळा.
Ata Thambaycha Naay ! चित्रपटाची कथा
आता थांबायचं नाय ! या चित्रपटात (आशुतोष गोवारीकर) उदयकुमार शिरुरकर जे बीएमसी चे सहाय्यक आयुक्त आहे. त्यांचे एक ध्येय असते दहावी अनुतीर्ण सफाई कर्मचाऱ्यांनी दहावी उत्तीर्ण व्हावे जेणेकरून त्यांना सुद्धा त्यांच्या कामात बढती मिळावी हे एक ध्येय घेऊन ते चालतात त्यासाठी ते बीएमसी कर्मचाऱ्यांसाठी रात्र शाळा सुरु करतात तसेच त्यांना दरमहा परीक्षा पास होई पर्यंत ३००० आर्थिक सहाय्य तसेच परीक्षा पास झाल्यास ५००० च्या बढती देण्याचे आश्वासन देतात. या कर्मचाऱ्यांमध्ये सखाराम मंचेकर (भरत जाधव),मारुती कदम (सिद्धार्थ जाधव),अप्सरा (किरण खोजे),जयश्री(प्राजक्ता हनमघर) हे सफाई कामगार असून आणि निलेश माळी (ओम भूतकर ) हे शिक्षक असतात. Ata Thambaycha Naay : बी.एम.सी.कर्मचाऱ्यांची रात्र शाळा.
या चित्रपटात कर्मचाऱ्यांच्या शिक्षणाच्या प्रवासातील संघर्ष,त्यांचे कौटुंबिक जीवन,समाजातील भेदभाव आणि त्यांच्या आत्मविश्वासाची वाढ यांचे चित्रण केले आहे.निलेश माळी (ओम भूतकर)या शिक्षकाने या कर्मचाऱ्यांना शिकवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले असून त्यांच्या कठोर परिश्रमामुळे हे सर्व सफाई कामगार दहावीची परीक्षा उत्तम प्रकारे उत्तीर्ण होतात. Ata Thambaycha Naay (आता थांबायचं नाय !) परंतु हि दहावीची परीक्षा उत्तीर्ण होण या सर्व लोकांसाठी एवढे सोपे नव्हते हे आपल्याला चित्रपट बघताना कळते वैयक्तिक जीवनापासून ते कामापर्यंत अनेक उतार चढाव या विद्यार्थ्यांच्या उर्फ या सफाई कामगारांच्या आयुष्यात येतात.सकाळी पहाटेच उठून संध्याकाळ पर्यंत काम करून,संध्याकाळी थकल्या नंतर रात्र शाळेला जाऊन अभ्यास करणे हे वाटते तेवढे सोपे नाही. दिग्दर्शक शिवराज वायचळ यांनी खूप सुंदर पद्धतीने प्रत्येकाची दैनंदिन जीवन तसेच त्यांचे घुसमटलेले आयुष्य या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. Ata Thambaycha Naay : बी.एम.सी.कर्मचाऱ्यांची रात्र शाळा.
दिग्दर्शक शिवराज वायचळ यांनी चित्रपटात खूप सुंदर पद्धतीने काही कलाकारांचे प्लॉट रंगवलेले आहे.जे मनोरंजनात्मक असून भावनिक सुद्धा आहे.या चित्रपटात भावनिक प्रसंग सुद्धा आपलेसे वाटून जातात प्रत्येकाच प्लॉट बघता भरत जाधव (सखाराम मंचेकर) हा एक सिनियर कर्मचारी ज्यांचा मुलगा अपघातात वारला असून त्यांना एक सून व नातू आहे या तणाव मुळे रोज ते दारू पितात व सतत चिंतेच्या दबावाखाली जगतात आणि नातवंड असलेल्या वयात रात्र शाळेला जाणे म्हणजे त्यांच्या साठी वाटते तेवढे सोपे नव्हते. भरत जाधव (सखाराम मंचेकर) यांचा नातवा सोबत एक सीन आहे जिथे त्यांचा नातू त्यांना बोलतो की या बॉलला गटाराचा वास आहे हा सीन म्हणजे त्यांच्या अंगावरती येतो. यावरून त्यांच्या लक्षात येत की आपण भलेही हि मुंबई साफ करत आहे परंतु लोकांचा आपल्या कडे बघण्याचा दृष्टीकोन हा गटाराचा आहे. व हा दृष्टीकोन बदलण्यासाठी ज्या रात्र शाळेला भरत जाधव (सखाराम मंचेकर) विरोध करत होता तोच आता त्या शाळेला जाण्याचा निर्णय घेतो जेणे करून त्यांचा नातवाला त्यांचा अभिमान वाटेल. Ata Thambaycha Naay : बी.एम.सी.कर्मचाऱ्यांची रात्र शाळा.
असाच प्रसंग सिद्धार्थ जाधव (मारुती कदम) याच्या साठी सुद्धा रात्र शाळा एवढी सोपी नाही मुलीच्या अडमिशन करीता पैसे घेतले असून पैसे मागणारा वारंवार दरवाजात येत असतो. मारुती मागे त्यांची बायको,मुलगी तसेच वडील असा परिवार असून बीएमसी मध्ये सफाई ची नौकरी करून घर चालवणे एवढे त्याच्या साठी सोपे नव्हते अतिरिक्त पैसे मिळावे म्हणून रात्री टॅक्सी चालवतो.या चित्रपटात दीपक शिर्के यांनी वडिलाची भूमिका केली असून सिद्धार्थ जाधव व दीपक शिर्के यांचा एक जबरदस्त भावनिक सीन आहे ज्यात टॅक्सी मध्ये दीपक शिर्के (भाऊ) सिद्धार्थ (मारुती कदम) ला बोलतात की आजसे तेरी बेटी के सपनो के लिये तु मेहनत करेगा और मेरे बेटे के सपनो के लिये मै मेहनत करुंगा आज से ये टॅक्सी मै चलाउंगा या चित्रपटातील हा एक भावनिक सीन आहे.चित्रपटातील सागर चा मृत्य म्हंजे अंगावर काटा आणणारा सीन आहे ज्या द्वारे कळते की कधी कधी गटार साफ करण्यासाठी त्यांना ड्रेनेज मध्ये सुद्धा उतरावा लागत. दिग्दर्शकाने हा चित्रपट भावनीकच नाही तर चित्रपटातील छोटे छोटे विनोत सुद्धा आपलेसे वाटतात. आता थांबायचं नाय ! हे या चित्रपटातील महत्व पूर्ण गाण आहे. Ata Thambaycha Naay : बी.एम.सी.कर्मचाऱ्यांची रात्र शाळा.
Ata Thambaycha Naay ! चित्रपटाचे दिग्दर्शन व अभिनय
आता थांबायचं नाय ! या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवराज वायचळ यांनी केले असून त्यांची दिग्दर्शक म्हणून हि पहिलीच फिल्म आहे. याआधी त्यांनी बऱ्याच मराठी चित्रपटात अभिनेता म्हणून देखील काम केले आहे. दिग्दर्शन शिवराज वायचळ यांनी सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाचे अचूक दिग्दर्शन केले असून त्यांनी लोकांच्या संघर्षाची कथा प्रभावी पणे मांडली आहे. चित्रपटातील भरत जाधव यांचे सखाराम मंचेकर हे पात्र आपलेसे वाटते भरत जाधव यांचे भावनिक पैलू त्यांनी उत्कृष्टपणे मांडले आहे या सोबतच सिद्धार्थ जाधव,ओम भूतकर, पर्णा पेठे, दीपक शिर्के, किरण खोजे, प्राजक्ता हनमघर,प्रवीण डाळिंबकर यांनी उत्तम रित्या त्यांच्या भूमिका मांडल्या आहे खास करून प्राजक्ता हनमघर हि चांगलीच भाव खाऊन गेली.आशुतोष गोवारीकर (उदयकुमार शिरुरकर जे बीएमसी चे सहाय्यक आयुक्त) यांचे पात्र साधे परंतु एक शिस्तबद्ध अधिकारी म्हणून उत्तम रित्या त्यांचे पात्र त्यांनी साकारले असून रोहीण हट्टंगडी यांची सुद्धा भूमिका आहे.
Ata Thambaycha Naay ! चित्रपटातील संदेश
आता थांबायचं नाय ! दिग्दर्शकाने महत्वाचा संदेश दिला आहे.जर शिकण्याची इच्छा असेल तर वय हे कधीच आडव येत नाही. प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा अधिकार असून चित्रपटात शिक्षणाचे महत्व पटवून दिले आहे.ज्याद्वारे मनुष्य त्याचे जीवन बदलू शकते. आता थांबायचं नाय ! हा केवळ मनोरंजनात्मक चित्रपट नसून एक प्रेरणा देणारा चित्रपट आहे जो प्रत्येकान कुटुंबासोबत बघावा असा असून समीक्षकांनी सुद्धा या चित्रपटाला दाद दिली आहे. टाईम्स ऑफ इंडिया ने या चित्रपटाला ५ पैकी ३.५ स्टार दिले आहेत तर महाराष्ट्र टाईम्स ने ५ पैकी ३ स्टार दिले असून या चित्रपटाचे आय.एम.डी रेटिंग ८.८ आहे. Ata Thambaycha Naay: बी.एम.सी.कर्मचाऱ्यांची रात्र शाळा.