गदर २ च्या जबरदस्त यशानंतर सनी देओल चे चाहते जाट (Jaat) या चित्रपटाचे आतुरतेन वाट पाहत होते.१० एप्रिल २०२५ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून ये ढाई किलोका हाथ पुरी नॉर्थ देख चुकी है अब साउथ भी देखेगा सनी चा हा जबरदस्त संवाद प्रेक्षकांची चांगलेच मन जिंकतो जाट (Jaat) च्या यशा नंतर सनी देओल खूप खुश असून जाट हि मास्क फिल्म आहे. या चित्रपटाला जरी संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी प्रेक्षक चित्रपट गृहात जाऊन सनी च्या या जबरदस्त एक्शन चित्रपटाला ला पसंती देत आहेत. Jaat – सनी देओल च्या ढाई किलो ने वाजवला बॉक्स ऑफिस वरती दणका.
Jaat – सनी देओल च्या ढाई किलो ने वाजवला बॉक्स ऑफिस वरती दणका
जाट (Jaat) हि सनी देओल ची अॅक्शन फिल्म असून दक्षिणात्य चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक गोपीचंद मालीनेनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.या चित्रपटात सनी देओल रणदीप हुडा,रेजिना कसांद्रा, संयामी खेर, विनीत कुमार सिंग, जगपती बाबू, रम्या क्रिष्णन मुख्य भूमिकेत असून जाट (Jaat) हि एक मास्क व अॅक्शन फिल्म आहे. जबरदस्त ड्रामा तसेच चित्रपटातील विनोद व पाजी ची एक्शन प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास मदत करते.या चित्रपटात सनी देओल यांनी ब्रिगेडियर उर्फ जाट बलदेव प्रताप सिंग,रणदीप हुडा याने रणतुंगा ज्याची संपूर्ण गावात भीती असते. रेजिना कसांद्रा ने भारती रणतुंगा पत्नी, विनीत कुमार सिंग ने रणतुंगा चा भाऊ तर संयामी खेर ने एस.आय. विजया लक्ष्मीची भूमिका केली आहे.चित्रपटातील सर्वांचा अभिनय जबरदस्त असून या चित्रपटाची निर्मिती मिथ्री मूवी मेकर्स ने केली आहे ज्यांनी पुष्पा (Pushpa) ची निर्मिती केली होती. Jaat – सनी देओल च्या ढाई किलो ने वाजवला बॉक्स ऑफिस वरती दणका.
Jaat (जाट) – कथा
या चित्रपटाची सुरुवात होते श्रीलंकेतील जाफना टायगर फोर्स पासून ज्यात दिसते की रणतुंगा (रणदीप हुड्डा) व त्याचा भाऊ (सोमुलू) विनीत कुमार सिंग व त्याच्या काही सहकाऱ्या बरोबरजीवनात एका ठिकाणी जाफना टायगर फोर्स ने मागे ठेवलेले सोने खदन करतांना सापडते व तेव्हाच निर्णय घेतात की जीवनात आता पुढे जाण्याचा हाच मार्ग आहे. रणतुंगा त्याचा भाऊ सोमुलू व काही साथीदार हे सोने पळवण्याचा निर्णय घेतात परंतु ते एवढे सोपे नसते कारण आजू बाजूला श्रीलंकेची फोर्से असते.परंतु तरी सुद्धा रणतुंगा हे सोने पाळण्याचा निर्णय ठाम घेतो.श्रीलंकेचे सैन्य या सर्वाना थांबवण्याचा प्रयत्न करतात परंतु रणतुंगा व त्याची माणसे या सर्व फोर्स ला निर्दयी पणे मारून समुद्रा मार्गे आंद्र प्रदेश येथे पोहचतातयेथे पोहचतच पोलीस त्यांना पकडतात परंतु रणतुंगा हा पोलिसांना सोन्याची लाच देऊन रणतुंगा हा भारतीय नागरिक बनतो. रणतुंगा व त्याचा भाऊ सोमुलू हे आंद्रप्रदेशातील मोटूपल्ली या गावात आणि आसपास आपले स्वतःचे गुन्हेगारी साम्राज्य स्थापन करतो.आपले साम्राज्य स्थापन करण्यासाठी तो सर्वाना क्रूर पणे मारतो त्यामुळे त्या गावातील आसपासचे लोक तसेच अधिकारी हे त्याला घाबरत असून त्याच्या साठी काम करण्यास सुरुवात करतात.जेव्हा एस.आय.विजया लक्ष्मी (संयामी खेर) रणतुंगा ला अटक करण्यासाठी जाते.तेव्हा रणतुंगा ची पत्नी भारती (रेजिना कसांद्रा) हि विजया तसेच बाकी लेडीज पोलिसांना मारहाण करून त्यांचे कपडे काढून त्यांना हवेलीत कैद करते.भारताच्या राष्ट्रपती वसुंधरा (रम्या क्रिष्णन) ला जेव्हा अंगठ्यांनी भरलेला बॉक्स तसेच एक पत्र मिळते यात ती रणतुंगा पासून संरक्षण करण्याची मागणी करते.व वसुंधरा हि जबाबदारी सी.बी.आय.अधिकारी सत्यमूर्ती (जगपती बाबू) कडे देते.
थोड्या वेळाने आपल्याला दिसते की जाट (Jaat) सनी देओल प्रवासी बनून चेन्नई हून उत्तर प्रदेश अयोध्या ट्रेन न ने जात आहे.पुढे काही अपघात झाल्यामुळे ट्रेन आंद्रप्रदेशातील चिराला गावी थांबते.भूक लागल्या मुळे सनी बाजूला एक छोटस हॉटेल असत तिथे तो जेवण करतो जेवण करत असताना तिथे काही गुंड येतात आणि त्या गुंडाचा धक्का लागून सनी च्या हातातील प्लेट खाली पडते.सनी त्याला माफी मागायला लावते परंतु तो गुंड हे मोटूपल्ली आहे, येथे ना कुणी कुणाची माफी मागत नं कुणी माफ करत सनी ला या गोष्टीचा राग येतो व तो या गुंडाना चांगला मारहाण करतो.ते गुंड सांगतात की आम्ही येथील राजकारणी राम सुब्बा रेड्डी चे माणसे असून आम्ही माफी मागत नाही शेवटी त्या गुंडाला घेऊन सनी राम सुब्बा रेड्डी याच्या घरी येतो व सांगतो की मै इडली खा रहा था इसने धक्का मारा मेरे हाथ से प्लेट नीचे गिर गई मैने कहा से सॉरी इसने सॉरी बोला नही फिर इसे मैने बहोत मारा लेकीन इसने भी सॉरी नही बोला तो फिर इसने नाम लिया सोमुलू का जो त्याच्या भावासारखा असून तो तुला सोडणार नाही अशी धमकी देतो.मग सनी त्याला घेऊन सोमुलू पाशी येतो त्याला सुद्धा तो तीच स्टोरी सांगतो परंतु सोमुलू सुद्धा सॉरी म्हणत नाही तो त्याचा भाऊ रणतुंगा ची धमकी देतो. सनी सोमुलू ला खूप मारतो व त्याला घेऊन रणतुंगा कडे येतो शेवटी त्याला रणतुंगा कडून सॉरी हा शब्द मिळतो.व सनी खुश होऊन तेथून निघतो तेच त्याला निघतांना काही गोष्टी विचित्र गोष्टी खटकतात.तेथे त्याला पोलीस ची गाडी तसेच खाली पडलेल्या काही महिला पोलिसांचे कपडे सापडते ज्या अंदर हवेलीत कैद असतात.जाट सनी तेथे रणतुंगा च्या माणसाना मरून कैद असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांना रणतुंगा च्या तावडीतून सोडवतो.रणतुंगा ला एका सनी ने चलेंज दिल्या मुळे रणतुंगा च्या चांगलीच जिव्हारी येते. Jaat – सनी देओल च्या ढाई किलो ने वाजवला बॉक्स ऑफिस वरती दणका.
रणतुंगा आपल्या माणसाना सनी ला तसेच त्या महिला पोलिसांना मारण्यास पाठवतो या पाठ्लागेत सुद्धा हा जाट सर्वांवरती भारी पडतो परंतु या हमल्यात आयेशा नामक लेडीज पोलीस जखमी होऊन मरण पावते.सनी व हे पोलीस अधिकारी एका गावात येतात तिथे त्यांना अम्मा (झारिंना वहाब) गावातील रणतुंगा च्या दुष्कृत्या बद्दल सांगते रणतुंगा एका राजकारणी च्या सांगण्यावरून हे गाव खाली करायचे असते ज्या साठी त्याला २५००० करोड एवढी रक्कम मिळणार असते ज्यासाठी तो लोकांचे जबरदस्ती ने अंगठे घेतो येथील भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याच्या मदतीने हे गाव खाली करण्यसाठी किती लोकांना निर्दयी पणे रणतुंगा ने निष्पाप लोकांना निर्दयी पणे मारले. या गोष्टी चा सनी ला राग येतो व सनी जाट की रणतुंगा च्या तावडीतून सोडवण्याची प्रतिज्ञा करतो. Jaat – सनी देओल च्या ढाई किलो ने वाजवला बॉक्स ऑफिस वरती दणका.
सनी प्रथम पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंपलेंट रजिस्टर करतो परंतु तिथे त्याची खिल्ली उडवली जाते व सनी ला बेड्या ठोकून पकडेल जाते तेथील भ्रष्ट पोलीस अधिकारी सोमुलू ला बोलावतो.इथे सनी सोमुलू तसेच इतर पोलिसांना विजया लक्ष्मीच्या मदतीने मृत्यू दंड देतो.आपल्या भावाला खूप वाईट पद्धतीने मारल्यामुळे रणतुंगा ला चांगलाच राग येतो व बदला घेण्यासाठी तो निघतो.
सी.बी.आय. ऑफिसर सत्यमूर्ती ला कळते की रणतुंगा हा दुसरा कोणी नसून आंतरराष्ट्रीय दहशदवादी मुथूवेल करीअलन आहे जो जाफना टायगर फोर्से चा माजी डेप्युटी कमांडर आहे.जेव्हा सत्यमूर्ती रणतुंगाला पकडण्यासाठी मदत मागतो.तेव्हा सुखवीर सिंग सांगतो की ब्रिगेडियर बलदेव प्रताप सिंग जाट (Jaat) तेथेच असल्याचे सांगतो. ब्रिगेडियर बलदेव प्रताप सिंग हा दुसरा कुणी नसून हाच जाट सनी देओल असतो.इथेच रणतुंगा गावातील पकडलेल्या माणसाना एक एक करत मारतो तेव्हा ब्रिगेडियर बलदेव प्रताप सिंग जाट तेथे पोहोचतो व रणतुंगा ला यमसदनी पाठवतो.एस.आय. विजया लक्ष्मी हि भारती ला पडण्यासाठी तिच्या घरी जाते तेव्हा भारती हि विजया व काही पोलीस अधिकाऱ्यासमोर आत्महत्या करते.सत्यमूर्ती राष्ट्रपतींना मिशन पूर्ण झाल्याचे सांगते. Jaat – सनी देओल च्या ढाई किलो ने वाजवला बॉक्स ऑफिस वरती दणका.
Jaat – चित्रपटा विषयी
दिग्दर्शक गोपीचंद मालीनेनी हा दक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक असून जाट (Jaat) हिंदीतील त्याची पहिलीच फिल्म आहे.इंटरव्हल पर्यंत हा चित्रपट विनोदी तसेच एक्शनपट असून सनी देओल जाट (Jaat) च्या भूमिकेत चांगलाच शोभून दिसतो इंटरव्हल चित्रपट भावनिक होतो.चित्रपटातील स्टोरी विशेष नसून नेहमी प्रमाणे कथानक आहे परतू दिग्दर्शक गोपीचंद मालीनेनी हा चित्रपट व्यावसायिक दृष्ट्या कमालीचा बनवला. रेजिना कसांद्रा हिने सादर केलेले भारती चे पात्र खूपच निर्दयी असून या भूमिकेला ती खूप शोभून दिसते.चित्रपटातील गाणी लक्षात राहण्याजोग नसून पार्श्व संगीत जबरदस्त आहे. जाट (Jaat) हा चित्रपट प्रेक्षकांनी आवर्जून बघावा असा हा पैसा वसूल मनोरंजक चित्रपट आहे.
समीक्षक
बॉलीवूड हंगामाने या चित्रपटाला ५ पैकी ३.५ स्टार दिले आहेत,टाईम्स ऑफ इंडियाने सुद्धा या चित्रपटाला ३.५ स्टार दिले आहेत या चित्रपटाने पहिल्या दिवशी ९.५ करोड चा बिजिनेस केला असून आजच्या दिवसा पर्यंत या चित्रपटाने ७४.५५ करोड रुपयाचा बिजिनेस केला आहे. Jaat – सनी देओल च्या ढाई किलो ने वाजवला बॉक्स ऑफिस वरती दणका.