पाताल लोक २

पाताल लोक या हिंदी वेब सिरिज चा पाताल लोक २  हा सिझन १७ जानेवारी २०२५ ला अमेझॉन प्राईम वरती प्रदर्शित झाला आहे.जयदीप अहलावत,ईश्वाक सिंग,गुल पनाग, निरज काबी यांची महत्वाची भूमिका असून,अविनाश अरुण यांनी या  पाताल लोक २ दिग्दर्शन  केले असून सिनेमॅटोग्राफी सुद्धा केली आहे.

पाताल लोक २
पाताल लोक २मध्ये जयदीप अहलावत, फोटो क्रेडीट – आय.एम.डी.बी.

पाताल लोक २ हि गुन्ह्याचा तपास असलेली थ्रिलर वेब सिरीज आहे.ज्याचे  आय.एम.डी.बी. रेटिंग १० पैकी ८.२ आहे.क्लिन सलेत फिल्म्झ  निर्मित असलेली हि वेबसिरज प्रेक्षकांनी बघावी अशी आहे. हाथीराम चौधरी एक मितभाषी  पोलीस अधिकारी हि  भूमिका जयदीप अहलावत ने खूप चांगल्या पद्धतीने रंगवलेली आहे. ज्यासाठी त्याला बेस्ट अॅक्टर  चा अवार्ड सुद्धा मिळाला.या सिरीज ला फिल्म फेअर अवार्ड ओ.टी.टी.चे आठ नॉमिनेशन असून जयदीप अहलावतला बेस्ट अॅक्टर चा अवार्ड मिळाला असून ,बेस्ट सिरीज ,बेस्ट ओरिजिनल स्टोरी,बेस्ट स्क्रीन प्ले,तसेच बेस्ट दिग्दर्शनासाठी अविनाश अरुण याला अवार्ड मिळाला आहे.     

हाथीराम चौधरी हा दिल्लीतील अतिशय हुशार  पोलीस अधिकारी आहे.पण त्याने केलेल्या चांगल्या कामाचे श्रेय त्याचे उच्चपदस्थ घेतात.त्याच्या चुका काढण्यात पुढे असलेल्या अधिकारी वर्गाने त्याच्यातील धाडसी वृत्तीचे कधीच कौतुक केले नाही.कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी असलेल्या हाथीराम चौधरी सहृदय आहे.मितभाषी असल्याने आपण केलेल्या कामाचे ढोल बडवणे त्याला जमत नाही.पण त्याची खंत आहे की,इतके चांगले काम करूनही त्याच्या कामाची कुठेच कदर नाही होत.घरी कमी वेळ दिल्यामुळे पत्नी (गुल पनाग) नाराज आहे,मुलगाही त्याचे ऐकत नाही.एक दिवस एका गुन्ह्याचा तपास करताना,एका अनाथ झालेल्या बालकाला तो घरी घेऊन येतो.या मुलाच्या वडिलांच्या गायब होण्याचा तपास करताना त्याला वेगळेच धागेदोरे सापडतात. त्याची पाळेमुळे नागालँडमध्ये पोहोचलेली असतात.तिकडे दुसराच गुन्हा घडलेला असतो…

अलीकडेच अमेझॉन प्राईम वरती प्रदर्शित झालेल्या पाताल लोक -२  मधील पहिल्या भागाचे कथानक सुरु होते.”पाताल लोक” या गाजलेल्या  वेब सिरीज चा पाच वर्षाच्या खंडानंतर आलेला पाताल लोक २ हा दुसरा सीझन.यातील पाचही एपिसोड प्रेक्षकांना खिळवून ठेवतात आणि त्याचे मुख्य कारण आहे.जयदीप अहलावतचा संयत अभिनय.हाथीराम चौधरी हि एका मितभाषी पोलीस अधिकाऱ्याची व्यक्तीरेखा आहे.कमीत कमी बोलणाऱ्या या व्यक्तीच्या मनात काय चालल असावं,हे जयदीपच्या चेहऱ्यावरून  समजते.त्या अनाथ मुलाकडे बघणाऱ्या हाथीराम कडे बघितल्यावर प्रेक्षकांच्या लक्षात येते. की आता तो त्या बालकाला घरी घेऊन जाणार,पोलीस अधिकाऱ्याची कष्टप्रद नौकरी सोडून दरमहा दोन लाखाच्या नौकरीची ऑफर मिळताच जयदीप चा चेहरा बघून लक्षात येते की,पगारासाठी हा चौकीदारी करणार नाही.आणि घडतेही तसेच.

हाथीराम चौधरी अत्यंत चतुराईने,जीवाची बाजी लावून मोठी टोळी पकडल्यावर त्याचे श्रेय वरिष्ठ अधिकारी घेतात.ते प्रसिद्धी साठी फोटो काढत असतात.तेव्हा हाथीराम चौधरी बाजूला एका पायरीवर बसलेला असतो.तसेच त्याच्या शेजारी पोलिसांचा एक श्वान दिसतो.असे अनेक सूचक प्रसंग पाताल लोक २ सीझन मध्ये आपल्याला दिसतात.हाथीराम अगदी मोजकेच बोलतो.जेव्हा एक अधिकारी म्हणतो, “प्रोटोकोल की वजह से  विर्क सर को इन्फोर्म करणा पडा” त्यावेळी हाथीराम चौधरी म्हणतो,जरुरी है सर, प्रोटोकोल  फॉलो करणा  बहोत जरुरी है.वैसे भी रेस के घोडो को  पता होता है की जितने के बाद मेडल उसको नही  मिलने वाला.अशा संवादावेळी जयदीप ने केलेला अभिनय हि एखद्या इमानदार पोलीस अधिकाऱ्याची खंत वाटते.

पाताल लोक २ याचे दिग्दर्शन अविनाश अरुण यांनी उत्तम रित्या केले असून सिनेमॅटोग्राफी हि पाताल लोक २ या सिरीज ची उत्तम बाजू आहे.तर एका मागोमाग एक एपिसोड बघण्यास भाग पाडणारी राहुल कनोजिया यांची बांधीव पटकथा हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य.पाताल लोक २ हि गुन्ह्याचा तपास असलेली थ्रिलर वेब सिरीज आहे.तरी त्यातून अनेकांचे स्वभाव विशेष समोर येतात.पोलीस यंत्रणा कसे काम करते ? यात इमानेइतबार काम करणाऱ्या आणि संख्येने कमी असणाऱ्या पोलिसांची कशी फरपड होते ? राजकीय व्यवस्था पोलिसांना कसे वापरून घेते ?  मोठ्या व्यवहारांमध्ये छोटे मासे जाळ्यात कसे अडकतात ? अशा वास्तवावर हा सिरीज संयत पणे भाष्य करते.पहिल्या दोन भागात घडणाऱ्या दोन वेगवेगळ्या घटना एकमेकांशी कशा संबधित आहेत,याचे धागेदोर  पाताल लोक २  या सीझन मध्ये प्रेक्षकांना उलगडताना दिसते.याचे श्रेय पटकथे प्रमाणेच संयुक्ता कझा यांच्या संकलनालाही जातात.कोणती घटना अंधारात घडतात ? लख्ख प्रकाशात काय घडते ? प्रत्येक घटना वेगवेगळ्या रंगात कशा प्रकारे दाखवावी,हे सुद्धा तितकेच महत्वाचे असते.आणि त्यावर  दिग्दर्शकाने विचार केलेला आहे.या सर्वांचा प्रेक्षकांच्या मानसिकतेवर अप्रत्यक्षरित्या परिणाम होतो आणि त्यामुळेच  ती कलाकृती मनाला भिडते.

जयदीप अहलावतच्या अभिनायाप्रमाने ईश्वक सिंग,गुल पनाग,अनुराग अरोरा,तिलोत्तमा शोम यांचा अभिनय दाद देण्यासारखा आहे.यातील बरेच प्रसंग नागालँड मध्ये घडतात.त्यामुळे त्याराज्याचे सौदर्य आणि तिथली संकृती याचे दर्शनही घडते.जहनू बरुवा,प्रशांत तमंग अशा तितल्या अनेक स्थानिक कालकारांना या सिरीज मुळे आपले कलागुण दाखवण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळाले,हे महत्वाचे आहे.अर्थात या संधीचे सोने केले आहे.सेव्हन सिस्टर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशान्य कडील निसर्गसंपन्न राज्यांच्या या  निमित्ताने परिचय हिट आहे.हि बाब तितकीच सकारात्मक आहे.

सध्या देल्ही कॉप्स,सोनाक्षी सिंह अभिनित असलेली दहाड ,केके मेनेन अभिनित स्पेशल ऑप्स,खाकी : द बिहार चाप्टर,देल्ही क्राईम,रोहित शेट्टी दिग्दर्शित असलेली इंडियन पोलीस फोर्स अशा वेगवेगळ्या थाटनीच्या पोलीसांवारती असलेल्या वेबसिरीज असून सुद्धा पाताल लोक २  या वेब सिरीज ने अमेझॉन प्राईम वरती चांगलाच धुमाकूळ गाजवला आहे.या सिरीज चे सर्वच एपिसोड प्रेक्षकांना चांगलेच गुंतवून ठेवतात. हाथीराम चौधरी हि एका मितभाषी पोलीस अधिकाऱ्याची व्यक्तीरेखा आहे.ज्या साठी जयदीप अहलावत ला बेस्ट अॅक्टर चा अवार्ड मिळाला आहे.खरच त्याची करावी तेवढी तारीफ कमीच आहे. खट्टा मिठा,महाराज,गब्बर : इज बॅक, राझी,गँग्स ऑफ वासेपूर, जानेजान मध्ये जयदीप अहलावत ने अभिनय केला असून पातल लोक मध्ये मिळालेल्या हाथीराम  चौधरी या भूमिकेच त्याने सोन केल आहे.तो किती ताकदीचा कलाकार आहे ते  जयदीप अहलावत ने पाताल लोक मध्ये सिद्ध केल आहे.पाताल लोक हे नागालँड सारख्या सुंदर स्थळी चित्रित झाली असल्यामुळे संपूर्ण वेब सिरीज बघताना नागालँड सौंदर्य बघताना खूप छान वाटते.आणि अविनाश अरुण स्वतः सिनेमॅटोग्राफर असल्यामुळे त्याने ते सौंदर्य खूप छान पद्धतीने टिपले आहे.या सीझन मध्ये या सीझन मध्ये राजकीय हत्या दाखवली असून जिचा खूप खोलात तपास होतो.या सिरीज मध्ये नुसता गुन्हेगारी पैलू च नाही तर राजकीय व सामाजिक पैलूही दमदार पणे यात मांडले आहे.जे प्रेक्षकांना दमदार पणे खिळवून ठेवतात.सुदीप शर्मा आणि अविनाश अरुण यांनी पुन्हा हि वेब सिरीज बनवून पुन्हा सिद्ध केले आहे. की २०२५ मध्ये हि वेब सिरीज सर्वोत्तम वेब सिरीज ठरू शकते.

२०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या पाताल लोक या वेब मालिकेचा पहिला सीजन सुदिम शर्मा यांनी क्रियेट केला असून अविनाश अरुण यांनी दिग्दर्शित केला होता.हत्या, भ्रष्टावाद.धाडसी पोलीस अधिकारी सखोल तपास या पार्श्वभूमी मुळे वेगवेगळे पात्र वेगवेगळ्या कथा लेखकाने,दिगदर्शकाने चांगल्या रंगवलेल्या आहेत.त्यात जयदीप अहलावत च्या हाथीराम चौधरी ने तर या वेब सिरीज मध्ये कमालच केली.१७ जानेवारी २०२५ रोजी  अमेझॉन प्राईम वरती प्रदर्शित झालेली पाताल लोक सीजन २ नक्की बघावा.व हाथीराम चौधरी एक मितभाषी अधिकारी जो कधीच आपल्या कामाचे कौतुक करत नाही.त्याचे आपण कौतुक करावे.

FAQ

QUES -1 पाता लोक सीझन २ आहे का?

पाताल लोक २ हा पाताल लोक चा सीझन दोन असून १७ जानेवारी २०२५ ला ला अमेझॉन प्राईम वरती प्रदर्शित झाला आहे.

QUES-2 पाताल लोक‘ ही खरी कहाणी आहे का?

यांच्या २०१० मध्ये रिलीज झालेल्या तरुण तेजपाल यांच्या कादंबरीवर पातल  लोक आधारीत आहे.

Leave a Comment