श्याम बेनेगल समांतर चित्रपटाचा नायक

अंकुर,मंथन,भूमिका,निशांत या सारखे समांतर चित्रपट बनवून श्याम बेनेगल यांनी हिंदी चित्रपटांचा चेहरा बदलला.

श्याम बेनेगल समांतर चित्रपटाचा नायक
Image Source-Google

श्याम बेनेगल समांतर चित्रपट बनवून बदलला हिंदी चित्रपटाचा चेहरा

दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित श्याम बेनागल यांचा जन्म १४ डिसेंबर १९३४ रोजी हैदराबादच्या त्रिमुलगिरी येथील कोंकणी भाषिक हिंदू कुटुंबात श्याम सुंदर बेनेगल या नावाने झाला.त्यांचे वडील कर्नाटकचे होते.जेव्हा ते १२ वर्षाचे होते,तेव्हा त्यांचे फोटोग्राफर वडील श्रीधर बी.बेनेगल यांनी त्यांना दिलेल्या कॅमेऱ्यावर त्यांनी पहिला चित्रपट बनविला.हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र एम.ए.ची पदवी प्राप्त केली.बेनेगल यांच्या करियर ची सुरुवात मुंबई स्थित जाहिरात एजन्सी मध्ये कॉपी रायटर म्हणून झाली. त्यांची पहिली डॉक्युमेंटरी घेर बेथा गंगा असून त्यांनी ९०० पेक्षा जास्त माहितीपट व जाहिरातींचे दिग्दर्शन केले.१९६६ ते १९७३ च्या दरम्यान बेनेगल यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) येथे शिकवले तसेच दोनदा ते संस्थेचे अध्यक्ष सुद्धा राहिले.बेनेगल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार,पद्मश्री,पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अंकुर,मंथन भूमिका,निशांत सारखे सामाजिक सिनेमा बनवले असून भारत एक खोज सारखा  शो बनवून हिंदी सिनेमाला नवी दिशा दिली.म्हणूनच श्याम बेनेगल समांतर चित्रपटाचा नायक म्हणून संबोधल्या जाते. चित्रपट सृष्टीत त्यांचा उल्लेख  समांतर चित्रपटांचे पायनियर म्हणून  होतो.

सामाजिक चित्रपट बनवून हिंदी सिनेमाला दिली नवी दिशा

१९७० च्या दशकात जेव्हा राजेश खन्ना, ऋषी कपूर,अमिताभ बच्चन यांचे हिंदी रोमँटिक चित्रपटांचे चलन असताना याच काळात या चित्रपटांना आव्हान देण्यासाठी श्याम बेनेगल यानी सामाजिक चित्रपट बनवून हिंदी चित्रपटाला एक नवी वेव दिली या चित्रपटातून त्यांनी समाजातील आरसा दाखवण्याचे काम केले.व येथूनच त्यांची ओळख श्याम बेनेगल समांतर चित्रपटाचा नायक म्हणून निर्माण झाली.त्यांचे चित्रपट बघताना.आज TVF चे संस्थापक अरुणभ कुमार यांचे टी.व्ही. शो.बघताना श्याम बेनेगल यांच्या चित्रपटाची आठवण येते.कारण अरुणभ कुमार यांचे टी.व्ही. शो.सुद्धा श्याम बेनेगल यांचे चित्रपटासारखे समांतर आहे.

 

अंकुर,निशांत,मंथन,कलयुग हे बेनेगलांचे बेस्ट चित्रपट

सुरवातीच्या काळात बेनेगल यांनीच त्यांच्या चित्रपटाचे लेखन केले अंकुर हा त्यापैकी एक.अंकुर हा श्याम बेनेगलांचा पहिला चित्रपट ज्याचे लेखन व दिग्दर्शन श्याम बेनेगलानीच केले. जो १९७४ मध्ये मोठ्या पडद्यावर  प्रदर्शित झाला, हा शबाना आझमी चा सुद्धा पहिलाच चित्रपट होता.या सिनेमाला नॅशनल अवॉर्ड मिळाला असून ४० पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे.शबाना आझमी यांना सुद्धा या चित्रपटा साठी नॅशनल अवॉर्ड मिळाला असून गोविंद निहलानी यांनी या चित्रपटाची सिनेमाटोग्राफी केली आहे. हा चित्रपट बर्लिन इंटरनॅशनल चित्रपट महोत्सवात सुद्धा नॉमिनेटेट झाला होता. या चित्रपटाच आयएमडीबी रेटिंग आठ असून अॅमेझोन प्राईम वर चित्रपट उपलब्ध आहे.

१९७५ साली श्याम बेनेगलांचा निशांत हा चित्रपट प्रदर्शित झाला.याचे लेखन सत्यदेव दुबे व विजय तेंडूलकर यांनी केले असून गिरीश कर्नाड, अनंत नाग यांच्या प्रमुख भूमिका असून स्मिता पाटील यांचा हा पहिलाच चित्रपट होता

भारताच्या दुध क्रांतीच्या काथावर आधारित १९७६ साली मंथन हा श्याम बेनेगेलांचा सुंदर चित्रपट यात ग्रामीण भारताची कथा सांगण्यात आली आहे. यात वर्गीस कुरीयनची श्वेतक्रांतीची सुरुवात आणि यशोगाथा दाखवण्यात आली आहे. गरिबी,वासना,मत्सर, क्रूरता असलेला बेनेगल यांचा हा गडद चित्रपट गिरीश कर्नाड,स्मिता पाटील,नसिरुद्दीन शहा यांनी यात महत्वाच्या भूमिका केल्या असून गोविंद निहलानी यांची सिनेमाटोग्राफी आहे. मंथन हा पाच लाख शेतकऱ्याच्या योगदानातून बनलेला चित्रपट आहे.त्यासाठी शेतकऱ्यांनीप्रत्येकी दोन रुपये देऊन हा सिनेमा शक्य केला आहे. २०२४ मध्ये श्याम बेनेगलांचा मंथन हा चित्रपट ४८ वर्षानंतर कान्स चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला. यासाठी चित्रपटाला स्टँडिंग ओव्हेशन मिळाली हीच तर बेनेगल यांची जादू  या चित्रपटाला सुद्धा नॅशनल अवॉर्ड मिळाला असून चित्रपटाला आयएमडीबी रेटिंग १० पैकी ७.७ आहे.

 

१९८१ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट कलयुग आपल्या दोन व्यवसायिक कुटुंबाची कथा सांगते जे व्यवसायाच्या क्षेत्रात वर्चस्वासाठी लढत आहेत.पण या लढ्यामुळे दु:ख आणि मृत्य ओढवले जातात कलयुग हा आतापर्यंतच्या सर्वोत्तम भारतीय चित्रपटांपैकी एक आहे,सत्यदेव दुबे व गिरीश कर्नाड लिखित या चित्रपटात शशी कपूर,रेखा,राज बब्बर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत,श्याम बेनेगलांचा कलयुग या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फिल्मेअर पुरस्कार मिळाला आहे.या चित्रपटाचे सुद्धा आयएमडीबी रेटिंग ७.८ असे आहेत.

श्याम बेनेगल यांचे हे चित्रपट आयएमडीबी वरती सर्वोच्च रेटिंग चित्रपट आहेत जे बघितल्या नंतर कळते त्यांची चित्रपटाच्या पटकथेवर किती पकड होती.उगाचच श्याम बेनेगल समांतर चित्रपटाचा नायक म्हणून उल्लेख होत नाही.

बॉलीवूड चा बेनेगल यांच्या कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला

ग्रामीण दडपशाहीवरील त्यांच्या तीनही पहिल्या क्रांतिकारी चित्रपटांनी अनेक राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही त्यांनी जोरदार प्रभाव पाडला.यानंतर बेनेगल यांनी स्वतःच्या इंडस्ट्री कडे म्हणजेच  फिल्म इंडस्ट्रीकडे लक्ष घातलं.

श्याम बेनेगल यांचा पुढील चित्रपट “भूमिका” (१९७७). जो १९४० च्या दशकातील अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या जीवनावर आधारित होता.या चित्रपटात सुद्धा बेनेगल यांचा फोकस स्पष्ट होता. हि कथा होती एका स्त्री च्या आत्मशोधा च्या प्रवासाची,ज्याचे पात्र शेवटी स्त्रीवादाचे आणि स्वाभिमानाच्या लढाईचे प्रतिक बनते.बेनेगल आणि स्मिता पाटील यांनी पडद्यावर  दिसणाऱ्या सिनेमा भ्रमाचे पदर फाडून टाकले.

शशी कपूर यांना सुद्धा श्याम बेनेगल यांच्या चित्रपटाची भुरळ

१९८0 पर्यंत बॉलीवूड चे प्रसिद्ध अभिनेते शशी कपूर यांचा मसाला चित्रपटांपासून भ्रमनिरास झाला होता.त्याला अर्थपूर्ण चित्रपट बनवायचे होते बेनेगलच्या यांच्या चित्रपटांना पाहून ते फार  प्रभावित झाले व बेनेगलांना ते सामील झाले. त्यांच्या आशा कधीच वाया गेल्या नाहीत.श्याम बेनेगल दिग्दर्शित जुनून १९७८, कलयुग १९८१ शशी कपूर यांनी या चित्रपटात अभिनयचं नाही तर निर्मिती सुद्धा केली आणि हे चित्रपट संस्मरणीय ठरले जुनून हि १८५७ च्या विद्रोहाच्या दरम्यान रचलेली आंतरजातीय प्रेमकथा होती.तर कलयुग हि महाभारतावर आधारित आधुनिक कथा होती. दोन्ही चित्रपटाना फिल्मफेअर,सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार तसेच राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला.दुर्दैवाने शशी कपूरच्या “साहस” ला व्यवसाइक यश मिळाले नाही चित्रपटाचे मोठे आर्थिक नुकसान झाले व बेनेगलासोबत त्यांची भागीदारी तुटली.

हा तो काळ होता जेव्हा बॉलीवूड  हिंसक चित्रपटाकडे वळत होता तरी  पण श्याम बाबुनी मार्मिक सामाजिक कथा सोडल्या नाहीत. “मंडी” (१९८३) मध्ये त्यांनी वेश्या व्यवसाय आणि राजकारणावर सखोल व्यंगचित्र काढले. “त्रिकाल” (१९८५) मध्ये त्यांनी ६० च्या दशकात गोव्यातील पोर्तुगीजांच्या शेवट दिवसांची कथा सांगितली.

बेनेगल यांनी दूरदर्शन साठी बनवला एक ऐतिहासिक शो

जेव्हा चित्रपटांसाठी पैसे मिळवणे कठीण झाले,तेव्हा ते दूरदर्शन कडे वळले आणि “भारत- एक खोज” सारखी उत्कृष्ट मालिका बनवली जी भारतीय इतिहासात व संस्कृतीवर सर्वात व्यापक व सिनेमॅटीक मानली जाते.त्यांनी त्यांचे गुरु,थोर चित्रपट निर्माते सत्यजित रे यांच्या जीवनावर आधारित माहितीपटही तयार केला होता.

९० दशकात ते साहित्याकडे वळले आणि त्यांनी धरमवीर भारती यांच्या कादंबरीवर आधारित “सुरज का सातवा घोडा” बनवला यानंतर त्यांनी महात्मा गांधी व सुभाषचंद्र बोस यांच्या वरील संस्मरणीय  चित्रपटाचे दिग्दर्शन केल.

समर १९९९ यांनी भारतीय जाती व्यवस्थेचा समाचार घेतला,या सर्व चित्रपटांन  पुरस्कार मिळत राहिले. बॉलीवूड पुढे सरकत होते. पण श्याम बेनेगल आपले काम जबाबदारीने  करीत राहिले.आणि अर्थपूर्ण काम करू इच्छीनाऱ्या चित्रपट निर्मात्यांना प्रेरणा देत राहिले,

“वेलकम टू सज्जन पूर” व “वेल डन अब्बा” नंतर त्याचा शेवटचा चित्रपट २०२३ मध्ये आलेला “मुजीब – द मेकिंग ऑफ नेशन” होता. शेकडो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सानानीत श्याम बेनेगल यांना २००५ मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीतले सर्वोच्च सन्मान पद्मश्री,पद्मभूषण,दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

श्याम बेनेगल यांनी जवळपास ५० वर्षे पडद्यावर खरी स्वप्न निर्माण केली.रोमांस पासून अॅक्शन पर्यंत,बच्चन पासून खान पर्यंत पडद्याचे नायक बदलत राहिले पण श्याम बेनेगल यांची सामाजिक बांधिलकी बदलली नाही. श्याम बाबू या नावाने प्रसिद्ध असलेले बेनेगल यांची सिनेमाची एक वेगळी शैली होती.व्यावसाईक सिनेमाचे स्वतःचे मोठे स्टार होते.श्याम बेनेगल यांनी इथेही समांतर टीम तयार केली.अंकुर चित्रपटातून हिंदी चित्रपट सृष्टीतील अतुलनीय नाईका शबाना आझमीने मेकअपशिवाय चित्रपटांमध्ये पदार्पण केले. नंतर च्या काळात अनेक नवीन कलाकारांना मुख्यत्वे FTII व NSD येथील कलाकारांना ओळख दिली.त्यात नसिरुद्दीन शहा,ओम पुरी,स्मिता पाटील,कुलभूषण खरबंदा व अमरीश पुरी असे दिग्गज कलाकार  आहेत. श्याम बेनेगल हि सिनेमाची एक चळवळ होती.एक प्रेरणा होती.संपूर्ण युग होत. म्हणूनच श्याम बेनेगल समांतर चित्रपटाचा नायक म्हणून त्यांची आजही ओळख आहे. त्यांच्या चळवळीला सलाम.

Leave a Comment