सुभाष घई – भारतीय चित्रपट सृष्टीचे शोमॅन

सुभाष घई – भारतीय चित्रपट सृष्टीचे शोमॅन हे चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक,निर्माता,पटकथा लेखक असून भारतीय चित्रपट सृष्टीतील त्यांच्या महत्वाच्या योगदानासाठी ओळखले जाते.तसेच ते व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल या फिल्म स्कूलचे संस्थापक देखील आहेत. १९८० ते १९९० च्या दशकात त्यांनी चित्रपट दिग्दर्शित तसेच निर्मित करून बॉलीवूड मध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले. सुभाष घई यांनी कर्ज (१९८०),हिरो (१९८३),सौदागर (१९९१),ताल(१९९९) असे मेन स्ट्रीम सिनेमें दिग्दर्शित केले.त्यांचे चित्रपट हे नेहमीच  नैसर्गिक व्हिज्युअल तसेच भव्य दिव्य कालाकृती असलेले सिनेमे.मुंबईत हिरो बनण्या साठी आलेले सुभाष घई हे भारतीय चित्रपट सृष्टीत दिग्दर्शक म्हणून प्रस्थापित झाले. चित्रपट तयार करण्याच्या त्यांच्या क्षमतेसाठी त्यांना बॉलीवूडचा शोमॅन म्हणून संबोधले जाते. सुभाष घई – भारतीय चित्रपट सृष्टीचे शोमॅन.

सुभाष घई – भारतीय चित्रपट सृष्टीचे शोमॅन
सुभाष घई – भारतीय चित्रपट सृष्टीचे शोमॅन / Photo credit -Imdb

सुभाष घई  यांचे प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

सुभाष घई यांचा जन्म २४ जानेवारी १९४५  रोजी नागपूर, महाराष्ट्र, भारत येथे झाला. सुभाष घई यांचा जन्म एका मध्यम वर्गीय कुटुंबात झाला असून त्यांचा चित्रपट सृष्टीशी काहीही संबंध नव्हता.त्यांना लहान पनापासूनच कलेची आवड होती त्यामळे त्यांनी कॉमर्स मध्ये पदवी संपादन केल्या नंतर त्यांनी पुणे येथे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफ.टी.आय.आय.) येथे अभिनयाचे शिक्षण घेतले.व तेथूनच त्यांची चित्रपट उद्योगाशी ओळख झाली. सुभाष घई – भारतीय चित्रपट सृष्टीचे शोमॅन.

सुभाष घई यांची करियर ची सुरुवात

पुणे येथे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफ.टी.आय.आय.) मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुभाष घई १९६०१९७०  च्या दशकात मुंबईत अभिनेतर म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी तकदीर (१९६७),राजेश खन्ना,शर्मिला टागोर अभिनित आराधना (१९६९) या चित्रपटा मध्ये छोट्या छोट्या भूमिका केल्या  परंतु  अभिनय क्षेत्रात त्यांना पाहिजे तस यश मिळाल नाही.व मग त्यांनी आपला मोर्चा दिग्दर्शनाकडे वळवला.    

सुभाष घई यांनी 1960 च्या उत्तरार्धात आणि 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला अभिनेता म्हणून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली, जरी त्यांना या क्षेत्रात फारसे यश मिळाले नाही. तकदीर (१९६७) आराधना (१९६९) यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांची भूमिका किरकोळ होती. घई यांना पटकन लक्षात आले की अभिनय हा त्यांचा उद्देश नाही आणि त्यांनी त्यांचे लक्ष दिग्दर्शनाकडे वळवले.व १९७६ साली शत्रुघ्न सिन्हा अभिनित कालीचरण या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले व त्यांनी भारतीय चित्रपट उद्योगात दिग्दर्शक म्हणून त्यांची स्वतः ची ओळख निर्माण केली. सुभाष घई – भारतीय चित्रपट सृष्टीचे शोमॅन.

१९८०  साली प्रदर्शित झालेल्या कर्ज या  चित्रपटामुळे  सुभाष घई यांना खरी ओळख मिळाली. ऋषी कपूर अभिनित हा सिनेमा जो पुनर्जन्मा आणि बदला वरती आधारित होता.जो एक थ्रिलर आणि गंभीर चित्रपट असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वरती चांगले व्यवसायीक यश मिळवले. त्यांच्या या सिनेमाच्या सादरीकरणाने सुभाष घई – भारतीय चित्रपट सृष्टीचे शोमॅन  म्हणून प्रस्थापित झाले.

सुभाष घई यांच्या कारकीर्दीचा उदय

ऋषी कपूर अभिनित कर्ज या चित्रपटाने सुभाष घई यांना यशाच्या शिखरावरती नेले या चित्रपटामुळे ते बॉलीवूड मधील आघाडीच्या दिग्दर्शकापैकी एक झाले कर्ज च्या यशनंतर सुभाष घई यांनी १९८२ साली विधाता हा चित्रपट बनवला जो व्यवसायिक रित्या व समिक्षकाच्या दृष्टीने सुद्धा यशस्वी सिद्ध झाला. हिरो (१९८३) हा चित्रपट सुभाष घई यांचा एक म्युझीकल लव स्टोरी असलेला चित्रपट  या चित्रपटा द्वारे जॅकी श्रॉफ यांनी बॉलीवूड मध्य पदार्पण केले.सुभाष घई यांचे चित्रपट म्हणजे लार्जर दॅन सिनेमा असलेले उत्तम कथानक,उत्तम संगीत व गाणी स्टार अभिनेत्या च्या मदतीने सुभाष घई यांनी त्यांच्या चित्रपटाला एका उंच ठीकानी नेऊन ठेवले. त्यांचे चित्रपट हे प्रेक्षकांच्या पसंतीस तर उतरलेच  आणि बॉक्स ऑफिसवर सुद्धा गल्ला जमवण्यास यशस्वी झाले  सुभाष घई – भारतीय चित्रपट सृष्टीचे शोमॅन.

१९८६ साली दिलीप कुमार, नूतन,अनिल कपूर, जॅकी श्रॉफ  या कलाकारांना घेऊन कर्मा या चित्रपटाची निर्मित  तसेच दिग्दर्शन केले देशभक्ती तसेच सुडाची कहाणी या चित्रपटात दाखवण्यात आले.हा चित्रपट म्हणजे सुभाष घई यांचा भव्य दिव्य चित्रपट जो त्यांना दिग्दर्शक म्हणून प्रस्थापित करण्यात यशस्वी झाला.

सौदागर (१९९१) या चित्रपटाचे लेखन,दिग्दर्शन व निर्मिती केली. या चित्रपटाची कथा मित्र आणि शत्रुत्वा वरती आधारित आहे.या चित्रपटात दिलीप कुमार तसेच राज कुमार बॉलीवूड च्या दोन दिग्गज अभिनेत्यांनी काम केले असून त्यांच्या अभिनयाची सर्वत्र तारीफ झाली. सौदागर हा सुभाष घई यांचा महत्वाच्या चित्रपटापैकी एक आहे.    

खलनायक (१९९३)  सुभाष घई यांचा हा चित्रपट एक क्राईम थ्रिलर असून एका कुख्यात गुन्हेगारावरती आधारती आहे. चोली के पीचे क्या है हे या चित्रपटातील गाण प्रचंड गाजल होत.

ताल (१९९९) हा म्युसिकल रोमँटिक ड्रामा असलेले चित्रपट जो पारंपारिक तसेच भारतीय संगीता वरती आधारित आहे.या चित्रपटात अनिल कपूर, ऐश्वर्या राय आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असून  ए.आर. रहमान संगीत बद्ध हा चित्रपट आहे.हा चित्रपट म्हणजे सुभाष घई यांचा भव्य दिव्य  चित्रपट. या चित्रपटाला अनेक पुरस्कार आणि नामांकने मिळाली,असून ज्यामुळे उद्योगात सुभाष घई यांची प्रतिष्ठा मजबूत झाली.

सुभाष घई यांची चित्रपट निर्मितीची शैली भव्य दिव्य असून उच्च संगीत बद्ध असे चित्रपट त्यांनी बनवले. सुभाष घई यांना खऱ्या अर्थाने प्रेक्षकांची नाळ कळल्यामुळे त्यांनी खऱ्या अर्थाने व्यवसायिक सिनेमाच बनवला ज्याला प्रेक्षकांनी डोक्यावती घेतले.त्यामुळेच सुभाष घई यांना राज कपूर नंतर भारतीय चित्रपट सृष्टीतील शोमॅन म्हणून ओळखले जाते. सौदागर(१९९१) ,खलनायक (१९९३), आणि ताल (१९९९) सारखे यशस्वी चित्रपट दिग्दर्शित करून सुभाष घई – भारतीय चित्रपट सृष्टीचे शोमॅन  झाले.

व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल या फिल्म स्कूल ची स्थापना

सुभाष घई यांनी  २००६ साली व्हिस्लिंग वुड्स इंटरनॅशनल या फिल्म स्कूल ची स्थापना केली.ज्यात निर्मित पासून तर दिग्दर्शना पर्यंत कलात्मक तसेच तांत्रिक शिक्षण दिल्या जाते.नवीन लोकांना चित्रपट सृष्टीत येताना कुठलीही अडचण जाऊ नये म्हणून त्यांनी या इंटरनॅशनल या फिल्म स्कूल स्थापन केली दरवर्षी नवीन नवीन विद्यार्थी या स्कूल मधून बाहेर पडून इंडस्ट्री मध्ये चांगली कामगिरी बजावत आहे.या मुळे सुभाष घई यांची कारकीर्द आकाशाला पोहोचली व्हिसलिंग वुड्स च्या माध्यमातून, सुभाष घई यांनी अनेक तरुण चित्रपट निर्माते आणि कलाकारांच्या करिअरला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सुभाष घई – भारतीय चित्रपट सृष्टीचे शोमॅन.

सुभाष घई  यांची नंतरचे कलात्मक आव्हाने

बॉक्स ऑफिस वरती गल्ला जमणारा दिग्दर्शक सुभाष घई  यांना एका दशका नंतर त्याच्या चित्रपटाना समिश्र प्रतिसाद मिळायला लागल २००८ साली दिग्दर्शित केलेला सिनेमा युवराज जो सलमान खान अनिल कपूर, कतरिना कैफ अशी स्टार कास्ट तसेच उत्तम गाणी,उत्तम संगीत व भव्य सेट असून सुद्धा हा चित्रपट यशस्वी ठरला नाही, जो दोन भावंडाच्या शत्रुत्वावर आधारित होता. किसना २००५  साली प्रदर्शित झालेला चित्रपट जो एक ऐतहासिक कथा असलेला चित्रपट सुद्धा प्रेक्षकांना आवडला नाही.

निष्कर्ष

सुभाष घई म्हणजे उत्तम संगीत,उत्तम गाणी याची जाण असलेला प्रतिभावंत दिग्दर्शक ज्याने भारतीय चित्रपट सुर्ष्टीत मोलाची भूमिका बाजवली त्यांचे बॉलिवूडमधील योगदान अतुलनीय असून. दिलीप कुमार,राजकुमार अभिनित सौदागर (१९९१) हा त्यांच्या प्रमुख चित्रपटांपैकी एक आहे. कर्ज(१९८०), हिरो (१९८३), आणि खलनायक (१९९३) सारख्या उत्तम चित्रपटाचे दिग्दर्शन करून व्हिसलिंग वुड्स सारख्या फिल्म स्कूल ची स्थापना केली ज्यात नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, सुभाष घई म्हणजे उत्तम कथानक चित्रित करून यशस्वी रित्या चित्रपट हिट करणारा दिग्दर्शक ज्याने खऱ्या अर्थाने प्रेक्षकांची नाळ ओळखली होती त्यामुळेच बॉलीवूड मध्ये त्यांना शोमॅन म्हणून ओळखले जाते. त्यांचे चित्रपट नेहमीच चित्रपट निर्मात्यांना प्रेरणा देत आहेत, आणि मनोरंजनाचा एक प्रकार आणि सामाजिक बदलाचे साधन म्हणून चित्रपटाकडे त्यांची दृष्टी भारतीय चित्रपटांच्या इतिहासावर चांगलीच  छाप सोडली आहे.त्यामुळेच सुभाष घई – भारतीय चित्रपट सृष्टीचे शोमॅन म्हणून सिद्ध झाले.

Leave a Comment