OTT वरती दक्षिणात्य चित्रपटांची भुरळ

पॅन इंडिया सिनेमा मुळे प्रेक्षकांना सध्या वेगवेगळ्या थाटणीचे चित्रपट बघायला मिळत आहे.अशातच सध्या Disney+hotstar वरती राजकुमार बालक्रिष्णन (Rajkumar Balkrishnan) दिग्दर्शित पार्किंग (Parking) व मेरी सेल्वाराजा (Meri Selvaraja) दिग्दर्शित वालई (Vaazhai) हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. सर्वसामान्यांच्या आयुष्यातील कथा या दोन्ही मल्याळम चित्रपटात सांगण्यात आल्या आहेत.जे बघितल्यावर चित्रपट रसिकांना आपली कथा वाटते म्हणूनच सध्या OTT वरती दाक्षिणात्य चित्रपटांची भुरळ आहे.

वालई:Vaazhai : वालई: केळी मजुरांच्या मुलांचे घुसमटलेले जग.

OTT वरती दक्षिणात्य चित्रपटांची भुरळ
A still from Vaazhai movie/snapshot@you tube

केळी हे तुलनेत स्वस्त आणि अधिक पौष्टिक असे फळ मानले जाते.भारतात महाराष्ट्रा प्रमाणे आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केळी उत्पादन होते.त्यातही आंध्र प्रदेशात सर्वाधिक म्हणजे ५८ लाख टन केळी उत्पादन होते. पण केवळ सर्वात जास्त उत्पादन होते म्हणून म्हणून का केळी स्वस्त मिळतात का? नाही! केळीच्या बागांमध्ये काम करणाऱ्या मजुरांना मिळणारी मेहनत अत्यल्प असली ,तरी बाजारात मात्र केळीचे दर चढेच असतात.केळीचे मोठ मोठे घट झाडावरून उतरवायचे, ते डोक्यावर घेऊन बागांमध्ये वाट काढत ट्रक पर्यंत जायचे आणि मग त्यामध्ये भरायचे ..हे काम करायचे किती पैसे या मजुरांना मिळत असतील? हातावर पोट असणाऱ्याअशा असंघटीत मजुराचे  प्रश्न काय आहेत? हे प्रश्न एरवी कोणाला पडणारही नाही. व या विषयावर सिनेमा काढला तर तो कोण बघणार.

लेखक-दिग्दर्शक मारी सेल्वाराजा यांचा वालई हा सिनेमा या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो.डिस्ने हॉटस्टार वर सादर झालेल्या या सिनेमाची कथा सेल्वाराजा यांची आहे.त्यांनी आपली गोष्ट लहान मुलांच्या नजरेतून मांडली आहे. शाळेत शिकणाऱ्या मुलाच्या –शिवानंद च्या घरी त्याची मोठी बहिण आणि त्याची आई असे तिघे राहत असतात.त्यांची गुजराण  केळीचे घट वाहून नेण्याच्या मजुरीने होते.पण त्याला हे काम आवडत नाही.त्याऐवजी त्याला शाळेत जायला आवडत. तो वर्गातला सर्वात हुशार विद्यार्थी असतो.कुणाच्या हि बालपणातील शाळेचे दिवस खूप रम्य असतात.पण शिवाची परिस्थती इतकी बिकट असते की,त्याला शाळे ऐवजी कामावर जावे लागते.या गोष्टीचा त्याला विलक्षण राग असतो.

या कथेत पुढे काय घडते, यापेक्षा ते ज्या पद्धतीने सादर केले आहे.ते फार महत्वाचे आहे.सिनेमाच्या सुरुवातीला एक मोठे रान दिसते.तिथे अनेक झाडे दिसते.शिवा मोठमोठ्याने हाका मारतो आहे.डोंगरावरून लंगडत लंगडत जाणारा रंडकुंडीला आलेला हा मुलगा काय शोधतोय.हे लवकरच समजते.विलोभनीय सिनेमाटोग्राफी,हे लवकरच समजते.अप्रितम प्रकाशयोजना हि या सिनामाची वैशिष्ट्ये पहिल्या पाच मिनिटात जाणवू लागतात. डोक्यावरचे केळाचे घट तो नदीत फेकूण देतो  आणि आपल्याला केळाच्या बागांचे विहंगम दृश्य दिसते.त्याचे वेळी पडद्यावर अक्षरे उमटतात  Vaazhai ज्याचा उच्चार होतो,वालई म्हणजे केळी.

सकाळ होताच शिवाची बहिण त्याला उठवते आणि म्हणते,उठ  आज केळीच्या घडांची हमाली करायला जायचं नाहीय,उठ ! हे ऐकताच तो उत्साहानं उठतो.खर तर त्याला रोजची सकाळ विलक्षण भीतीदायक वाटते.कारण शाळेत जाण्याऐवजी त्याला मजुरी करावी लागायची.या सिनेमातील प्रत्येक दृश्य अर्थपूर्ण आहे.दिवस उजाडताच कोंबड्या खुराट्यातून बाहेर काढल्या जातात. आणि पिल्लं इकडे तिकडे बागडतात हातावर पोट असलेल्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असली तरी शिवाच भाव विश्व खूप तरल असत.त्याला नदीत पोहायला आवडत,नदीकाठी मित्रांबरोबर गप्पा मारायला आवडतात,केळीच्या खोडाची होडी करून त्यावर मित्रांसोबत नाचायला आवडत.गणवेश घालून शाळेत जाणं हा तर त्याच्यासाठी खूप आनंदाचा क्षण ! कारण त्याला तिथ किमंत  असते.शिक्षक नेहमीच त्याच कौतुक करतात.शिवाच्या आयुष्यातील असे विरोधाभास सिनेमात दिसत असतात.कमीत कमी संवादातून ते अधिक बोलके होतात.

सिनेमा हे दृक श्राव्य मध्यम असल्याने  लेखक-दिग्दर्शक कॅमेऱ्यातून व्यक्त होतात.इथे थेनी ईश्वर यांची सिनेमाटोग्राफी दाद देण्यासारखी आहे.संतोष नारायणन यांच्या संगीताला तामिळनाडूच्या मातीचा सुगंध आहे.पोनवेल एम. याने साकारलेली शिवानंदची भूमिका हा या सिनेमाचा हायलाईट आहे.इतका नैसर्गिक अभिनय एका शाळकरी मुलाने केला आहे.त्यामध्ये त्याचे आणि दिग्दर्शकाचे कौतुक आहे.दिव्या दोरायस्वामी(बहिण),जानकी (आई),राहुल (मित्र)निखिला विमल (शिक्षिका)या सर्वांचा अभिनय इतका सुदर आहे.की आपण सिनेमा बघतो,हे क्षणभर विसरून जातो.

एखाद्या तुलनेत उपेक्षित असलेला सामाजिक प्रश्न किती कल्पकतेने मांडता येते.याचे उत्तम उदाहरण लेखक –दिग्दर्शक मारी सेल्वाराजा यांनी वालई तून उभे केले आहे.ऑस्कर ला पाठवण्यासाठी याची निवड झाली होती. आणि तो सिनेमा दहा सिनेमाच्या यादीतही होता.पण भारतातील उत्तम सिनेमा म्हणून तो पुढे पाठवण्यात आपण कमी पडलो.अशा स्थानिक प्रश्नांच्या उत्तम मांडणीमुळे एखाद्या प्रादेशिक सिनेमा जागतिक दर्जाचाही होऊ शकतो.महाराष्ट्रातील उस कामगारांचे,त्यांच्या कुटुंबाचे,मुलांच्या शिक्षणाचे असे अनेक प्रश्न आजही कायम आहेत.तेही अशा पद्धतीने मांडता येऊ शकतात.ते हा सिनेमा बघताना जाणवत रहातात.

पार्किंग (Parking)

OTT वरती दक्षिणात्य चित्रपटांची भुरळ
a still from Parking movie/snapshot @You tube

अलीकडच्या काळात तामिळ आणि मल्याळी चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग वाढतो आहे.याचे एक महत्वाचे कारण की,त्यांचे कथा विषय सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्याला भिडलेले असतात.आता शहरांमधील पार्किंग चे उदाहरण घेऊ.दिवसेंदिवस पार्किंग ची समस्या तीव्र होत आहे. आजकाल अनेक जण स्वत:चे वाहन खरेदी करतात.दुचाकी असल्यास पार्किंगचा प्रश्न तितकासा क्लिष्ट वाटत नाही.कार घेतल्यावर मात्र पहिल्यांदा हि अडचण सोडवावी लागते.मग अशा जनसामान्यांच्या प्रश्नांवर चित्रपट निघू शकतो?हो. हिंदी अथवा मराठी चित्रपटात लोकांच्या रोजच्या आयुष्यातील प्रश्न मांडले जात नाही,पण या विषयावर तामिळ भाषेमध्ये तयार झालेला एक उत्तम चित्रपट डिस्ने हॉटस्टार वर उपलब्ध आहे.राजकुमार बाळकृष्णन लिखित-दिग्दर्शित या चित्रपटाचे नावच “पार्किंग” असे आहे.

घरासमोर रिकाम्या जागेत कुणी कार पार्क करायची,यावरून दोन भाडेकरू एकमेकांवर कुरघोड्या करता करता स्वतः चा मानसिक तोल कसे हरवून बसतात,हे या चित्रपटातून दिसते.हरीश कल्याण आणि विशेषत:एम.एस.भास्कर यांच्या उत्तम अभिनयाने चित्रपटात रंगत आणली असली तरीही हा चित्रपट पटकथा लेखक आणि दिग्दर्शकाचा आहे.यामध्ये अभिनेत्री आहे.पण लौकिकार्थाने कुणी नायिका नाही.नायक नायिकेच्या प्रेमकथेचे प्रसंग नाहीत.चित्रपटाच्या मुळ विषयाशी प्रतारणा नं करता चित्रपट बनवणे कसे शक्य आहे,याचे उत्तम उदाहरण म्हणून तो बघावा.

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence)

OTT वरती दक्षिणात्य चित्रपटांची भुरळ
a still from Driving Licence movie/snapshot @you tube

चित्रपटातील अभिनेत्यांना एक वलय असते आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये त्यांच्या बद्दल एक अनामिक ओढ असते.औत्सुक्य असते,त्यांना भेटण्याची त्यांच्या सोबत सेल्फी काढण्याची हौस असते.या चाह्त्यांमुळे,ग्लॅमर च्या वलयामुळे कलाकारांच्या डोक्यात हवा जाते.आणि ते स्वतःला जगावेगळे समजतात.त्यातूनच मग सामान्य जनतेला लागू असलेले नियम न पाळण्याची त्यांना चटक लागू शकते. आणि तिथे फसगत होते.अशाच एका अभिनेत्याचे ड्रायव्हिंग लायसन्स गहाळ होते.आणि त्याशिवाय कार चालवताना अडवणाऱ्या आर.टी.ओ. इन्स्पेकटर  बरोबर बोलताना त्याचा इगो आडवा येतो.या दोघांतला सामना “ड्रायव्हिंग लायसन्स” मल्याळी चित्रपटात पटकथाकार सचे आणि दिग्दर्शक जीन पॉल लाल यांनी रंजकपणे खुलवला आहे.पृथ्वीराज सुकुमारन यानेही उत्तम अभिनय केला आहे.पण बाजी मारली आहेती सुरज वेंजारामूड यांच्या अभिनयाने.प्राईम वर उपलब्ध असलेला “ड्रायव्हिंग लायसन्स” वेगळ्या विषयासाठी आवर्जून बघावा असा नर्मविनोद चित्रपट आहे.या चित्रपटाचा हिंदी रिमेक सेल्फी डिस्ने हॉटस्टार वर उपलबद्ध आहे.परंतु त्या वाटेला नं जाता मूळ चित्रपट बघणे केव्हाही श्रेयस्कर .

तंत्रज्ञाना बद्दल माहिती घेऊन,मुलांशी संबंध सुधरण्याचा प्रयत्न करणारे वडील (होम),नाईलाजास्तव सरकारी इन्स्पेकटरची नौकरी करणाऱ्या युवकाचे एका गावातील अनुभव (पालतू जानवर),लग्नानंतर उच्च शिक्षणाऎवजी स्पर्धा परीक्षा देणारी युवती,आफ्रिकन फुटबाल खेळाडू केरळमधल्या एका गावातल्या फुटबाल टीम कडून खेळताना त्याला गावकऱ्याबोरोबर  आलेला अनुभव,एक निर्जन.पण निसर्गरम्य उंच टेकडावर असलेला वायरलेस पोलीस चौकीत दोन पोलिसांना थरारक प्रसंगांना समोर जावे लागते.त्याची कहाणी .अशा सर्वसामान्यांच्या आयुष्यातील कथा मल्याळम चित्रपटातून सांगण्यात आल्या आहेत.रोजच्या आयुष्यात कोणालाही समोर जावे लागणाऱ्या प्रसंगामुळे चित्रपटाच्या कथेला महत्व आले.आणि स्टार पेक्षा अभिनेते उजवे ठरले,त्यामुळे दक्षिणात्य ,विशेषत: मल्याळम चित्रपटांचा दर्जा उंचावला गेला.

तीन ते चार कोटी बजेट असलेल्या अशा अनेक दाक्षिणात्य चित्रपटाने २० ते २२ कोटी कमावले.असे दर्जेदार चित्रपट तिकीट खिडकी वरही यशस्वी ठरतात हे यातून सिद्ध होते.रोजच्या आयुष्यातील घटना हा चित्रपटांचा विषय होऊ शकतो.हे दाक्षिणात्य चित्रपटानी अनेक वेळा दाखवून दिल.त्यामुळे प्रादेशिक चित्रपटांशी तुलना केल्यास मराठी चित्रपटांवर त्यांनी कधीच मात केली आहे.मराठी चित्रपटांमध्ये वैविध्य नसल्याचे नेहमीच जाणवते.ठराविक देखणे स्टार असतील तरच चित्रपट चालतात,उत्तम कथांचे चित्रपट तिकीट बारीवर चालत नाहींत अशी मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकाची ठाम धारणा आहे.त्यामुळे मराठी प्रेक्षक ओटीटी वर मल्याळम,तामिळ चित्रपट बघणे पसंत करतात. ओटीटी चॅनेल हि मराठी चित्रपटांचा दर्जा ओळखून असल्यामुळे ते मल्याळी,तामिळ चित्रपट विकत घ्यायला प्राधान्य देतात खरे तर मल्याळी चित्रपट गेल्या दहा वर्षात कसा बहरला आहे,स्टार पेक्षा कथेला प्राधान्य दिल्यामुळे त्यांचे चित्रपट कसे दर्जेदार होत गेले आहेत.याचा मराठी निर्माते दिग्दर्शकांनी अभ्यास करायला हवा.

Leave a Comment